कोरोना काळात नागरिकांचे सहकार्य अधिक महत्त्वाचे 

अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन पाटील यांचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रतिपादन
Published:Aug 11, 2020 09:00 AM | Updated:Aug 11, 2020 09:00 AM
News By : Muktagiri Web Team
कोरोना काळात नागरिकांचे सहकार्य अधिक महत्त्वाचे 

‘सातारा जिल्ह्यात तब्बल 2,677 इतके रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. यंत्रणा संपूर्ण सतर्क आहे. शहरासह ग्रामीण भागातही कोरोना विषाणूचा प्रभाव वाढत आहे. आरोग्य विभागाची जबाबदारी दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर जनतेची साथ आता अत्यंत महत्त्वाची आहे,’ असे प्रतिपादन अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी पत्रकाद्वारे केले आहे.